10 amazing places to visit during monsoon
पावसाळा म्हणजे निसर्गाचा सण. गार वारे, कोसळणारा पाऊस, धुके, आणि हिरवागार नजारा – ही सगळी निसर्गाची देणगी मनाला नवचैतन्य देते. पावसाळ्याचे दिवस फिरण्यासाठी अगदी योग्य मानले जातात. विशेषतः जेव्हा आपण डोंगररांगांमध्ये, धबधब्यांच्या जवळ किंवा हिरव्या जंगलांत जातो. यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात एक स्वर्गीय अनुभव मिळतो. या लेखात आपण महाराष्ट्रात पावसाळ्यात फिरण्यासारखी १० सुंदर ठिकाणांची माहिती घेणार आहोत.
🏞️१. महाबळेश्वर( Mahabaleshwar)-जिल्हा- सातारा
वैशिष्ट्ये- धुकट वातावरण, स्ट्रॉबेरी फॉर्म्स, अनेक पॉइंट्स जून ते सप्टेंबर महाबळेश्वरला फिरण्यास उत्तम वेळ हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.पावसाळ्यात येथे धुकं आणि झऱ्यांचे सौंदर्य अधिक खुलतं. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. अर्ध्या किलोमीटरवर एकेक पॉइंट आहे.आर्थर सीट, एलफिन्स्टन पॉइंट, व्हेना लेक. निसर्गप्रेमींनी एकदा तरी भेट द्यावी असं ठिकाण. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडविक पॉइंट हे त्यांपैकी प्रसिद्ध डोंगरकडे असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी, रासबेरी, जांभळाचा मध व लाल मुळे, गाजरे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.महाबळेश्वराच्या मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे.हे ठिकाण क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे.पंचगंगा मंदिर,कृष्णाबाई मंदिर, मंकी पॉइंट, वेण्णा लेक (वेण्णा तलाव),लिंगमळा, धबधबानीडल होल पॉइंट / एलीफंट हेड पॉइंटकेटस् पॉईंट (नाकेखिंड) इ. प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत.
🌿 २. माळशेज घाट-( Malshej Ghat)-जिल्हा- पुणे-अहमदनगर/ ठाणे सीमेवर
वैशिष्ट्ये- धबधबे, पक्षी निरीक्षण घाट, हिरवळ. इथे फिरण्यासाठी उत्तम वेळ जुलै ते ऑगस्ट महिन्यात आहे.पावसाळ्यात हजारो लहान मोठे धबधबे, गडद ढग, आणि प्राचीन लेण्या हे माळशेजचे आकर्षण आहे.ट्रेकिंगसाठी आणि फोटोशूटसाठी खास पसंतीचं ठिकाण. खास करून येथे फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होते. जे पाहणे अद्भुत अनुभव असतो. माळशेज घाट हे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, इतिहासप्रेमी आणि साहसी गोष्टी शोधणाऱ्यांसाठी एक परिपूर्ण निवासस्थान आहे. हिरव्यागार दऱ्या, प्राचीन किल्ले, वाहणारे धबधबे आणि विविध वन्यजीवांसह हा निसर्गरम्य पर्वतीय खिंड विशेषतः पावसाळ्यात एक अविस्मरणीय अनुभव देतो.
🏕️ ३. भंडारदरा-(Bhandardara)-जिल्हा-अहमदनगर
वैशिष्ट्ये- अर्थर लेक, रंधा धबधबा, किल्ले रतनगड येथे जाण्याचा उत्तम वेळ जुलै ते सप्टेंबर महिन्यात. निसर्गसंपन्न ठिकाण आणि कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध असलेले भंडारदरा हे शांततेचं आणि पावसाळ्याचं परिपूर्ण मिलन आहे. येथे रंधा धबधब्याचा आवाज आणि धुक्याने वेढलेली पर्वतरांगा पाहणं म्हणजे आत्मा तृप्त होणं आहे. भंडारदरा मधील इतर आकर्षणे:
वाकीची वाट, अंब्रेला पॉइंट, आणि आजोबा डोंगर देखील येथे पाहण्यासारखे आहेत.भंडारदरा हे भंडारदरा धरण (विल्सन धरण) यासाठी प्रसिद्ध आहे. भंडारदरा धरण प्रवरा नदीवर असून तेथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना खूप आकर्षित करते.
🌊 ४. आंबोली घाट( Amboli Ghat) -जिल्हा- सिंधुदुर्ग
वैशिष्ट्ये- धबधबे, धुके, जैवविविधता फिरण्यासाठी उत्तम वेळ जून ते सप्टेंबर महिना कोकणातील शेवटचा थंड हवेचा घाट. आंबोली हे उष्णकटिबंधीय जंगलांनी वेढलेले आहे. येथे शुध्द ऑक्सिजनचा अनुभव घेता येतो. आंबोली धबधबा, महादेवगड पॉइंट हे मुख्य आकर्षण. प्रचंड पाऊस, इथे धब धबे, दाट जंगल आणि भरपूर विविध प्रकारची जैवविविधता आढळते. आंबोली घाटात दर वर्षी धबधबा पाहण्यासाठी खूप पर्यटक येतात. आंबोलीला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. (पर्जन्यमान ७५० सेंटिमीटर). आंबोलीमधील पारपोली गावाजवळचा धबधबा सर्वात मोठा आहे. आंबोलीजवळ नांगरतास हा प्रसिद्ध धबधबा आहे. येथील हिरण्यकेशी नदीचा उगम हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील देवराई समृद्धपूर्ण जैवविविधता संपन्न आहे.विविध प्रकारची बुरशी, बुरशीमुळे प्रकाशणारे लाकूड, उभयचर प्राणी, महाराष्टाचे राज्यफुलपाखरू व रानफुले या परिसरात पहायला मिळतात.
🧗♂️५. राजमाची फोर्ट-(Rajmachi Fort)- जिल्हा- पुणे
वैशिष्ट्ये- ट्रेकिंग, निसर्गदृश्य, ऐतिहासिक किल्ला यासाठी प्रसिद्ध आहे फिरण्यासाठी उत्तम वेळ ऑगस्ट ते डिसेंबर ट्रेकर्ससाठी स्वर्गसमान. राजमाची ट्रेक हा लोनावळा किंवा कार्ला लेण्यांपासून जाता येतो. पावसाळ्यात इथल्या वाटा चिखलाने भरतात पण हिरवाईने मन मोहून टाकते.प्रेक्षणीय स्थळे:श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले *शिरोटा धरणाचे विहंगम दृश्य *कातळधार धबधबा (पावसाळ्यात) ट्रेकिंग: राजमाची किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी वर्षभर वातावरण चांगले असते, विशेषतः पावसाळ्यानंतर.
🌁 ६. ताम्हिणी घाट-( Tamhini Ghat)-जिल्हा पुणे/ रायगड
वैशिष्ट्ये- घाट रस्ता, धबधबे, नदी पात्रं फिरण्यासाठी उत्तम वेळ ऑगस्ट ते डिसेंबर पुणेकर आणि मुंबईकरांसाठी जवळचं आणि सोपं डेस्टिनेशन. पावसात इथे घाटातून जाताना वाटणारी शांतता आणि गारवा विसरता येणार नाही. रस्ता प्रवासात अनेक पॉइंट्सवर थांबून निसर्गदृश्यांचा आनंद घ्यायला मिळतो. ताम्हिणी घाट हा महाराष्ट्रातील मुळशी आणि ताम्हिणी यांच्यामध्ये स्थित एक पर्वतीय मार्ग आहे. पश्चिम घाट पर्वतरांगांच्या शिखरावर वसलेला ताम्हिणी घाट त्याच्या निसर्गरम्य धबधबे, तलाव आणि घनदाट जंगलांनी भरलेल्या परिसरासाठी प्रसिद्ध आहे.
⛺ ७. लवासा-( The Lavasa)- जिल्हा- पुणे
वैशिष्ट्ये- कृत्रिम शहर, लेकसाईड व्ह्यू, रिसॉर्ट्स फिरण्यासाठी उत्तम वेळ जुलै ते सप्टेंबर सध्या हे स्थळ बंद करण्यात आले आहे. युरोपियन शहरासारखा अनुभव देणारे लवासा पावसाळ्यात आणखीच सुंदर दिसते. पर्यटकांसाठी उत्तम सुविधा, शांतता आणि रिमझिम पाऊस यामुळे या शहरात तुमचा अनुभव खास बनवतो. पंचवीस हजार एकर जागेतील ही परियोजना आहे. लवासाची चौकशी करणाऱ्या भारतीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या पथकाने असा निष्कर्ष काढला की लवासा हे शहर पर्यावरणाचे नुकसान करत आहे कारण लवासा “पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य टेकड्यांमध्ये” बांधले गेले आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. जे त्याच्या सदाहरित उष्णकटिबंधीय जंगलांसाठी ओळखले जाते. जे असुरक्षित किंवा धोक्यात असलेल्या 325 प्रजातींना आश्रय देतात यामुळे लवासा सिटी बंद करण्यात आली.
🌄 ८. हरिश्चंद्रगड-( Harishchandragad)- जिल्हा- अहमदनगर
वैशिष्ट्ये- ट्रेकिंग, कोकण कडा, इतिहास फिरण्यासाठी उत्तम वेळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी सह्याद्रीचा राजा समजला जाणारा हरिश्चंद्रगड हा ट्रेकर्समध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. पावसात कोकण कड्यावरून दिसणारी दरी, ढगांचे खेळ, आणि हिरवागार पठार अप्रतिम असतं.हरिश्चंद्रगडावर ‘कळस’ आणि ‘ताम्हिनी’ या दोन मुख्य ठिकाणांना भेट देणे आवश्यक आहे. तसेच ‘कोकणकडा’ आणि ‘हरिश्चंद्रेश्वर मंदिर’ ही ठिकाणे देखील बघण्यासारखी आहेत.
ट्रेकिंग मार्ग:हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यापैकी खिरेश्वर, पाचनई आणि बेलाचे डोंगर हे प्रमुख मार्ग आहेत.
🐚 ९. गणपतीपुळे-( Ganpatipule)- जिल्हा- रत्नागिरी
वैशिष्ट्ये- समुद्रकिनारा, गणपती मंदिर फिरण्यासाठी उत्तम वेळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी पावसाळ्यात कोकणात फिरणं म्हणजे हिरवळ, समुद्र, आणि कोळी जेवण यांचा आनंद. गणपतीपुळे हे एक धार्मिक आणि निसर्गसंपन्न ठिकाण असून येथे पावसात जाण्याची मजा काही औरच असते. गणपतीपुळेजवळील काही प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे म्हणजे गणपतीपुळे बीच, स्वयंभू गणपती मंदिर, जयगड किल्ला, जयगड दीपगृह, आणि कोकण संग्रहालय. आरे वारे बीच, हेदवी गणेश मंदिर
गणपतीपुळे बीच:
गणपतीपुळे बीच हा महाराष्ट्रातील एक सुंदर समुद्रकिनारा आहे. येथे तुम्ही शांतपणे बसून समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकता.
स्वयंभू गणपती मंदिर:
हे मंदिर गणपतीपुळेमधील एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. येथे गणपतीची स्वयंभू मूर्ती आहे.जी भक्तांसाठी पूजनीय आहे.
जयगड किल्ला:
हा किल्ला गणपतीपुळेजवळ असून ऐतिहासिक किल्ला आहे. किल्ल्यावरून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.
जयगड दीपगृह:
जयगड किल्ल्याजवळ असलेले हे दीपगृह देखील एक आकर्षक ठिकाण आहे.
कोकण संग्रहालय:
येथे कोकणातील संस्कृती आणि जीवनशैली दर्शवणारी विविध कला आणि वस्तूंचे प्रदर्शन आहे.
आरे वारे बीच:
हा एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. जो गणपतीपुळेजवळ आहे. येथे पर्यटकांसाठी अनेक जलक्रीडा आणि इतर मनोरंजक ऍक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत.
हेदवी गणेश मंदिर:
हे मंदिर गणपतीपुळ्याजवळ असून एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.
🏔️ १०. तोरणमाळ – सातपुडा पर्वत( Toranmal – Satpura Hills) जिल्हा – नंदुरबार
वैशिष्ट्ये -आदिवासी संस्कृती, गडद जंगलं, शांतता फिरण्यासाठी उत्तम वेळ जुलै ते सप्टेंबर महाराष्ट्राच्या उत्तरेतले एक दुर्लक्षित पण अत्यंत सुंदर ठिकाण. येथे कमी गर्दी असते त्यामुळे निसर्ग अधिक जवळून अनुभवता येतो. जंगल सफारी, धबधबे आणि स्थानिक संस्कृती अनुभवायला मिळते. तोरणमाळमधील प्रेक्षणीय स्थळे:
यशवंत तलाव:
हा तलाव पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
सीता-खाई दरी:
येथे एक सुंदर दरी आहे आणि धबधबा देखील आहे.
इतर:
तोरणमाळमध्ये अनेक डोंगर, दऱ्या-खोऱ्या आणि धबधबे आहेत.
सातपुडा पर्वतातील इतर ठिकाणे:
सातपुडा पर्वतरांगेत तोरणमाळ व्यतिरिक्त पंचमढी, धूपगढ, चौरागढ, असीरगड, अमरकंटक, गाविलगड, जंबुद्वीप, बी फॉल आणि चिखलदरा यांसारखी प्रसिद्ध गिरिस्थाने आणि पर्यटन केंद्रे आहेत.
📸 उपयुक्त टिप्स आणि सूचना-
फोटोसाठी वेळ- सकाळी लवकर किंवा संध्याकाळी – धुके आणि सूर्यप्रकाश दोन्ही मिळतात.
काय नको करायचं- धबधब्यांच्या खूप जवळ जाऊ नका. प्लास्टिक किंवा कचरा फेकू नका. ट्रेक करताना स्थानिक मार्गदर्शक घ्या. कॅरी कराव्या लागणाऱ्या गोष्टी रेनकोट/ छत्री , पाण्याची बाटली , ट्रेकिंग शूज, ओळखपत्र आणि थोडे रोख पैसे
📌 निष्कर्ष
पावसाळ्यात निसर्ग आपली सगळी रंगीबेरंगी बाजू दाखवतो. जर तुम्हाला धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडून शांतता हवी असेल तर वरील १० ठिकाणं नक्की भेट द्या. ही स्थळं केवळ सौंदर्याची अनुभूतीच देत नाहीत तर जीवनातली थोडी विश्रांतीही देतात.
FAQ
Q1. पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण कोणते? उत्तर – हरिश्चंद्रगड, राजमाची, आणि माळशेज घाट हे उत्तम ट्रेकिंगसाठी ओळखले जातात.
Q2.पावसात समुद्रकिनारी जाणं सुरक्षित आहे का? उत्तर – सुरक्षित आहे. पण समुद्रात उतरणं टाळावं. किनाऱ्यावरून निसर्ग अनुभवायला हरकत नाही.
Q3. पावसाळी सहलीसाठी काय तयारी आवश्यक आहे? उत्तर- रेनकोट, ट्रेकिंग शूज, प्राथमिक औषधे, पाण्याची बाटली, ऊर्जा वाढवणारा खाऊ.
हे पण वाचा
डिजिटल डिटॉक्स – नवा आरोग्य ट्रेंड
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना महाराष्ट्र
Also visit